Ad will apear here
Next
जगातील सर्वांत मोठ्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण
तेलंगण, आंध्रसह मराठवाड्याचीही तहान भागणार

मुंबई : महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरी नदीवरील तेलंगण येथील जगातील सर्वांत मोठ्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण २१ जून रोजी होत आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांनाही या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगमोहन रेड्डी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. 

जमिनीखालील १४.०९ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून गोदावरी नदीचे १३ अब्ज घनफूट(टीएमसी) पाणी उचलले जाणार असून, तब्बल १८ लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. जगातील हे सर्वांत मोठे भूमिगत पंपिंग स्टेशन आहे. 

 

‘मेगा इंजीनिअरिंग अँड इन्फ्रा लिमिटेड (एमईईएल) आणि भारत हेवी इलेक्ट्रिक यांनी १८ महिन्यांच्या विक्रमी वेळात हा प्रकल्प उभारला असून, यासाठी जमिनीखाली १४.०९ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात आला आहे,’ अशी माहिती प्रकल्प संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी दिली.


या बोगद्यात एकूण २० लिफ्ट आणि १९ पंप केंद्रे आहेत. या प्रकल्पासाठी चार हजार ६२७ मेगावॉट वीज लागणार असून, दररोज दोन अब्ज घनफूट पाणी उचलले जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ८० हजार कोटी रुपये खर्च आला आहे. विशेष म्हणजे भूमिगत पंपिंग स्टेशन असल्याने या भव्य प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZMPCB
 This is great project... Hopes it's very very important to all farmers in three states, which absolutely solve every farmers water problem..
Hopes more projects will do in future specific maharashtra impact it's important and needful than metro and such projects...
 Does this mean. --- it is now active , doing the job it was proposed
to do? Designs , planning , construction --- everything , entirey Indian ?
Real achievement !
Similar Posts
विवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत मुंबई : सध्या असलेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन धुळे जिल्ह्यातील कल्पेश आण‍ि प्रियांका देवरे या दाम्पत्याने विवाहावरील खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला अडीच लाख रुपयांची मदत केली आहे. दोन लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला
देशात सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात मुंबई : देशातील सर्वाधिक म्हणजे तब्बल आठ हजार ४०२ स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत. देशात एकूण २१ हजार ५४८ स्टार्टअप्सची नोंदणी करण्यात आली आहे.
नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी निवड मुंबई : शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. गोऱ्हे या विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत.
‘बोअरवेलसाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र महाराष्ट्रात यशस्वी’ मुंबई : ‘बोअरवेल खणण्यासाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र यशस्वी झाले आहे. या उपक्रमामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी एक चांगला उपाय सापडला आहे,’ असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव व नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे यांनी मुंबईत सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहनामुळे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language